सोमवार, २५ मे, २००९

संपूर्ण स्वीकार!!



संपूर्ण स्वीकार!!


आहे तस पूर्णपणे स्वीकारण्याची कला तूम्ही शिका. निसर्गाची सत्यता माना त्याच्या विरुद्ध जाण्याची कल्पना ही करू नका. आता जे आहे, त्याच्या विरुद्ध जाऊनका. फ़क्त नदीच्या प्रवाह बरोबर रहा.


दोन भटके प्रवासी झाडाखाली बसले असताना एक विचारतो, "जिम तुला माहिती आहे ... हा फिरतिचा व्यवसाय आयुष्यभर करत रहाणे, इकडे तिकडे भटकने, कोणालाही आपण नको असणे, तिरस्कार यूक्त नजरा, नको नको वाटते सग़ळ......."

जिम म्हणतो, "मग तू दुसरे काम का नही बघत?"

"काय दुसरे काम, आणि काय सांगू जगाला की मी पराभूत आहे म्हणुन..."



स्वताला कधीही पराभूत समजू नका. आहे तस स्वीकारणे यात फार मोठे यश लपलेले आहे. तुम्ही पराभूत होणारच नाही. या वृत्तिमुळे जगातली कोणतीही शक्ति तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. कारण पराभवाच्या छायेत पण तुम्ही आनंदाने नाचता . येणारी प्रत्येक संधि सुंदर निर्मितीत उपयोगात आणा.

जे काही घडते ते चांगलेच आहे........असे समजुन सहज पणाने घ्या . हे सुद्धा कायम राहणार नाहीये, तर बदलत जाणार आहे.

(सन्दर्भ : नवी पहाट)

रविवार, २४ मे, २००९

ओशो


अनेक वादाना कारणीभूत ठरलेले ओशो प्रत्यक्षात अतिशय विद्वान होते.मनाची पकड़ घेणारे वक्तृत्व, भाषेवरील प्रभुत्व, विविध विषयावरील गाढा अभ्यास, मानसिक शान्ति करता ध्यानाचे विविध उपाय आणि आधुनिक विचारसारणी यांच्या जोरावर अनेक वर्षे त्यानी लोकमनावर अधिराज्य केले.
त्यांच्या काही विचारांना विरोध पण खुप झाला पण ते आपल्या मताना चिटकुन राहिले.
आजही त्यांना मानणारा मोठा जनाप्रवाह अस्तित्वात आहे.